गेवराई

बापलेकासह तिघांचा शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू, गेवराईतील दैठण येथील दुर्दैवी घटना


गेवराई, दि. 10 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील दैठण येथील एका शेततळ्यात बुडून बाप-लेकासह भाच्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सुनिल जगन्नाथ पंडित (वय 40) त्यांचा मुलगा राज पंडित (वय 12) आणि सुनिल पंडित यांचा भाचा शेततळ्यावर गेले होते. यावेळी राज आणि सुनिल यांचा भाचा पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले असता ते दोघे पाण्यात बुडू लागले हे पाहून सुनिल पंडित यांनी शेततळ्यात उडी मारून या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनाही पोहता येत नसल्याने या तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!