बीड

..तर 28 फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकार्‍यांनीही मनाई आदेश ठेवला कायम


बीड, दि, 31 (लोकाशा न्यूज) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिनांक 28 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवलेला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1)(3) अन्वये जे आदेश लागू आहेत, त्या सर्व मनाई आदेशात वाढ करण्यात येत असून ते दिनांक 28 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत लागू राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काढले आहेत.
जिल्ह्यात यापूर्वी सदर कलमान्वये दिनांक 31 जानेवारी 2021 पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत, त्यात वाढ होऊन दिनांक 28 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत लागू राहतील. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1987 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनूसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!