धारूर

विजेचा शॉक देऊन मासे पकडने जीवावर बेतले, शॉक लागून दोन युवक ठार, धारुर तालुक्यातील दुर्दैवी घटना

बीड; दि. 13 : विजेचा शॉक मासे पकडणे दोन तरुणांच्या तरुणांच्या जीवावर घेतला आहे नदीच्या डोहात सोडलेला विजेचा शॉक लागून दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धारूर तालूक्यातील काळ्याचीवाडी येथे घडली
समाधान सहदेव रुपनर ( 21) आणि दिपक मारूती रुपनर ( 19 )अशी मृतांची नावे असून ते नात्याने चुलते-पुतणे होते.काल सांयकाळी नदीवर मासे पकडण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली.ऐन दिवाळीत रुपनर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

काल सायंकाळी गावापासून एक कि.मी असणाऱ्या नदीच्या डोहात विजेचा कंरट सोडून मासे पकडण्यासाठी गेले होते.मात्र हे त्यांच्या अंगलट आले. विजेचा शॉक लागून दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. दोघेही घरी परतले नाहीत म्हणून समाधानचे वडील काही ग्रामस्थांसह नदीकडे गेले. त्यावेळी त्यांना दोघेही मृत अवस्थेत आढळून आले. मृतामधील समाधान हा पोलीस भरतीची तयारी करत होता, तर दिपक आयटीआयची परीक्षा देऊन आला होता. धारूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली करण्यात आली मात्र दिवाळीत झालेल्या घटनेने काळ्याचीवाडी गावावर शोककळा पसरली आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने मासे पकडणे अंगलट आल्यामुळे इथून पुढे तरी मासे पकडण्यासाठी अशी पद्धत वापरताना दहा वेळेस विचार करावा.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!