माजलगाव

शिवसेना हा महाराष्ट्र अखंड ठेवणारा विचार – आप्पासाहेब जाधव

माजलगाव : लोकाशा न्यूजतोडा, फोडा आणि राज्य करा हा इंग्रजांचा विचार घेऊन महाराष्ट्र वेगवेगळ्या भागात विभागण्याचा विचार काही नतदृष्ट प्रवृत्ती करत असतात, पण महाराष्ट्र हा एक आसून कारवार, निपाणी व बेळगाव हे महाराष्ट्राचा भाग आहेत, हा अखंड महाराष्ट्र ठेवणारा विचार म्हणजे शिवसेना होय असे मत आप्पासाहेब जाधव यांनी व्यक्त केले, ते राजेवाडी येथे बोलत होते.महाराष्ट्रात सर्व महाराष्ट्रीयन‌ आहेत ते आठरा ‌पगडजातीचे मावळे ज्यांनी हा महाराष्ट्र घडविला, आज आपणास एकसंध रहाण्याची प्रेरणा देतात तोच विचार शिवसेना आहे असे प्रतिपादन बीड जिल्हा शिवसेना प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केले, ते शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने राजेवाडी येथे शिवसैनिकांच्या बैठकीत बोलत होते.या प्रसंगी संजय भाई महाद्वार,अमोल डाके, दासू बादाडे,सुखदेव धुमाळ, करण थोरात,जयराम राऊत,कोंडीबा काळे,राम कुलकर्णी,महेश थेटे ,पांडुरंग गोझे, नवनाथ शेळके, साहेबराव आव्हाड ,परमेश्वर गायकवाड, ईश्वर थेटे, सचिन साळुंके, दीपक महागोविंद ,रविराज महागोविंद, पंडित थेटे, अशोक थेटे, परमेश्वर नांदगावकर ,अतुल चव्हाण, संजय शिंदे, लक्ष्मण सोळंके, पत्रकार अखिल भाई, हरणे विलास,अमोल शिंगारे यांची उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!