देश विदेश

पंकजाताई केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटल्या, महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या प्रश्‍नांवर केली चर्चा


दिल्ली, दि. 17 (लोकाशा न्यूज) : केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांची बुधवारी दिल्ली येथे भेट घेवून राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खा.रणजितसिंह निंबाळकर, आ.रणजितसिंह मोहिते पाटील, आ.शिवेंद्रराजे भोसले, आ.राहुल कुल,पृथ्वीराज देशमुख आदिजण उपस्थित होते.
साखर उद्योगाच्या विविध समस्या, इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देणे, हा उद्योग जगला तर शेतकरी व कर्मचार्‍यांना त्याचा नक्कीच चांगला फायदा होईल, जे कारखाने बी हेवी मळीपासून इथेनॉल तयार करतात त्यांनाही मदत करणे गरजेचे आहे, यासह विविध समस्या संदर्भात बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी पंकजाताईंसह मंत्री रावसाहेब दाणवे पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राधाकिसन विखे पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, शिवेंद्र भोसले, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडीक, पृथ्वीराज देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, राहूल कुल यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!