राजकारण देश विदेश

babul supriyo : भाजपला झटका; खासदार बाबुल सुप्रियोंची राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा; 7 तारीख नंतर….

BJP MP Babul Supriyo
BJP MP Babul Supriyo

babul supriyo पश्चिम बंगालमधील भाजपचे आसानसोलमधील खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. फेसबुकवर मोठी पोस्ट लिहिली आहे. यातून त्यांनी बऱ्याच मुद्द्यांवर विचार मांडले आहेत.

कोलकाताः पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाचा या महिन्याच्या ७ तारखेला विस्तार झाला. यानंतर मंत्रिमंडळात फेरबदलही करण्यात आला. यावेळी भाजप खासदार बाबुल सुप्रियो (BJP MP Babul Supriyo) यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा ( babul supriyo to leave politics ) लागला होता. आपल्याकडून राजीनामा मागण्यात आला. तो आपण दिला, असं राजीनामा दिल्यानंतर त्यावेळी बाबुल सुप्रियो म्हणाले होते. आता बाबुल सुप्रियो यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित आपली वेदना मांडली आहे. तसंच राजकीय संन्यास घेत असल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आपण राजकारण सोडत आहोत, असं त्यांनी ( babul supriyo ) सांगितलं आहे.

मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ‘या’ एकमेव महिला खासदाराचा समावेश

मी आता जातोय, अलविदा. एक महिन्याच्या आत मी आपलं निवासस्थान सोडेल. तसंच खासदारकीचाही राजीनामा देत आहे, असं बाबुल सुप्रिया यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या निर्णयानंतर त्यांचे प्रशंसक आणि पक्षातील नेत्यांने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

BJP MP Babul Supriyo

बाबुल सुप्रियो हे पश्चिम बंगालमधील आसनसोलचे भाजप खासदार आहेत. राजकारणात येण्याआधी ते लोकप्रिय पार्श्वगायक होते. पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणूक झाली. यावेळी त्यांनी टॉलिगंजमधून निवडणूक लढवली होती. पण निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यामुळे पक्ष नेतृत्वावर नाराज होते.

‘कुठल्याही पक्षात जाणार नाही’

फेसबुकवर भलीमोठी फोस्ट लिहित बाबुल सुप्रियो यांनी राजीनामा देत मन मोकळं केलं. मी कुठल्याही पक्षात जात नाहीए. टीएमसी, काँग्रेस किंवा सीपीआयएममध्येही जात नाहीए. आपल्याला यासाठी कुठल्याही पक्षाने फोन केलेला नाही. मी फक्त एकाचा पक्षाचा खेळाडू आणि समर्थक आहे. ती म्हणजे भाजप. अमित शहा आणि जे. पी. नड्डांकडे राजकारण सोडण्याबाबत बोललो आहे. त्यांनी मला प्रेरणा दिली. याबद्दल त्यांचा आभारी आहे, असं बाबुल सुप्रियो म्हणाले.

‘राजकारणात नसतानाही समाजसेवा करू शकतो’

आई-वडील, पत्नी, मुलगी या मी सर्वांचं ऐकलं. राजकारणाच्या बाहेर राहूनही सामाजिक कार्य करता येऊ शकतं. पण आपण राजकारण का सोडलं? यावरून आपल्याला प्रश्न विचारला जाईल. मंत्रिपद गेल्याचा याच्याशी काहीही संबंध आहे का? याचं उत्तर होय, असंच असल्याचं ते म्हणाले. पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या पराभवाला आपणही जबाबदार आहोत. आपल्यासोबत इतरही नेते जबाबदार आहेत. पण इतर कोण जबाबदार आहेत, हे आपल्याला सांगायचं नाहीए. पण पक्षाची आणि वरिष्ठ नेत्यांची असहमतीने नुकसान होत होतं, असं सुप्रियो म्हणाले.

रामदेव बाबांशी विमानात एकदा छोटीशी बातचीत झाली होती. पश्चिम बंगाल निवडणूक भाजप गंभीरतेने घेत असल्याचं कळलं. आपल्याला उमेदवारी मिळेल, याची अपेक्षा नव्हती. पण आता सर्वांचं ऐकून आपण एक निर्णय घेतला आहे. अनिश्चिततेला न घाबरता जो विचार केला तेच केलं स्टँडर्ड चार्टर्ड बँकेची नोकरी सोडून मुंबईला जाताना १९९२ मध्ये हेच केलं होतं. आता पुन्हा तेच करत आहे, असं बाबुल सुप्रिया यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नौकरी अड्डा जॉब्स साठी इथे क्लिक करा

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!