करिअर

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

राज्यात वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे आता दहावीची परीक्षा जूनमध्ये तर बारावीच्या परीक्षा मे अखेरीस होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!