परळी

सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

चौघाविरुध्द ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

परळी, दि १६ ( लोकाशा न्युज ) :- मिरवट येथे चारीत्र्याच्या संशय घेवून शिवीगाळ मारहाण करुन शारीरीक मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळुन 25 वर्षे महिलेची आत्महत्या झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती अशी की, परळी तालु्नयातील मौजे मिरवट येथे आरोपीतांनी आपसात संगमत करुन मयत 25 वर्षीय महिलेची चारीत्र्याचा संशय घेवुन तीला शिवीगाळ मारहाण करुन तिला शारीरीक, मानसिक त्रास दिला. त्या त्रासाला कंटाळून मयत हिने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. मयताची आई सिता मिलिंद सरवदे रा.धानोरा ता.अंबाजोगाई जि.बीड यांच्या फिर्यादीवरुन राहुल कुंडलिक कसबे यांच्यासह इतर तीन जणांविरुध्द गु.र.नं.232/2020 कलम 306, 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज जिरगे हे करीत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!