अंबाजोगाई

जिल्ह्याचा विकास हेच आमचे ध्येय, पंकजाताईंच्या विजयासाठी जिल्ह्यात खा. प्रीतमताईंचा झंझावात


बीड, दि. 3 (लोकाशा न्यूज): जिल्ह्यातील प्रश्‍न छोटे असो की मोठे ते सोडवण्याचे काम आम्ही पावलोपावली केलेले आहे. जिल्ह्याचा विकास हेच आमचे ध्येय असल्याचा विश्वास खा.प्रितमताई मुंडे यांनी बोलून दाखवला आहे. पंकजाताईंच्या विजयासाठी जिल्ह्यात खा. मुंडेंचा झंझावात पहायला मिळत आहे. बुधवारी खा. मुंडे पंकजाताईंच्या प्रचारासाठी
बर्दापूर येथे गेल्या होत्या. बर्दापूर ग्रामस्थांनी खा. प्रितमताईंचे या वेळी मोठ्या उत्साहात स्वागत केले. पुढे बोलताना खा. मुंडे म्हणाल्या, पंकजाताईंच्या माध्यमातून बीड जिल्हावासियांना एक सक्षम नेतृत्व मिळालेले आहे. मंत्री असताना पंकजातासईंनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात निधी देण्याचे काम केलेले आहे. या वेळी त्यांनी कधीच भेदभाव केला नाही. बीड जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्‍न मार्गी लावण्यात पंकजाताईंचे मोठे योगदान आहे. तसेच ग्रामीण भागातील रस्ते असो की, अन्य कामे मार्गी लावण्यात ताईंचे मोठे योगदान आहे. यापुढेही जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आणि जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण पंकजाताईंच्या पाठिशी ताकतीने उभा राहून त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत मतदानरुपी आशीर्वाद द्या, असे आवाहन या वेळी खा. प्रितमताई मुंडे यांनी केले आहे. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अविनाश मोरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!