बीड अंबाजोगाई

भरधाव कारच्या धडकेत दोन ठार, दोन गंभीर

घाटनांदूर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना

अंबाजोगाई – भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून त्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या चौघांना जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर रस्त्यावरील दोघे आणि कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी (दि.०४) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला.
दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री एक कार (एमएच २० व्ही २५१८) भरधाव वेगाने अंबाजोगाईकडून आली. या कारच्या चालकाचे घाटनांदूर येथे चौकात गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावर उभे असलेल्या चौघांना धडक देऊन जवळपास शंभर मीटर अंतर फरफटत नेले. यात वैभव सतीश गिरी (वय २८!), लहू बबन काटुळे (वय ३०) यांचा मृत्यू झाला. तर, रमेश विठ्ठल फुलारी (वय ४७), उद्धव निवृत्ती दोडतले (वय ५०) आणि कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी तातडीने जखमींना स्वाराती रुग्णालयात दाखल केले. सदरील कार एवढी वेगात होती की तिच्या धडकेने रस्त्यावरील विद्युत खांब देखील उन्मळून पडला होता.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!