Uncategorized

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मे अखेरीस ? ‘हे’ चेहरे आहेत मंत्रिपदाचे प्रमुख दावेदार, बीडचे पालकमंत्री बदलणार


मुंबई-

राज्य मंत्रिमंडळाचा गेली दहा महिने रखडलेला विस्तार आता लवकरच होणार असून, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या महाराष्ट्र दौर्‍यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी त्यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. मे महिना अखेरीस मंत्रिमंडळाचा विस्तार करून शिंदे-फडणवीस सरकार लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याची शक्यता आहे. याबाबत पुण्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले आहेत. या विस्तरणांतर बीडचे पालकमंत्री बदलणार असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे बोलले जात असताना, भाजपने शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातही फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नांना यश आले तर मंत्रिमंडळात काही जागा पक्षात येणाऱ्यांसाठी असाव्यात म्हणूनही त्या रिक्त ठेवल्याची चर्चा भाजपमध्ये होती. मात्र, आता भाजप-शिवसेना आपल्या जागा भरणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

‘हे’ चेहरे आहेत प्रमुख मंत्रीपदाचे दावेदार ?

भाजपमधून माजी मंत्री संजय कुटे, जयकुमार रावल, पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ, मुरबाडचे आमदार किसन कथोरे, राणा जगजितसिंह पाटील, रणधीर सावरकर, नितेश राणे, प्रशांत ठाकूर, योगेश सागर अशा चेहर्‍यांना संधी मिळू शकते.तर शिंदे गटातून संजय शिरसाट, योगेश कदम, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, बालाजी किणीकर, बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!