बीड

गायब झालेले कोळगावचे मठाधिपती परतले; अटकपूर्व जामिनसाठी न्यायालयात धाव

गेवराई, दि.22 (लोकाशा न्युज) ः– विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सोशल मीडियावर आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल करुन गायब झालेले कोळगाव येथील मठाधिपती हनुमान महाराज गिरी हे पंधरा दिवसानंतर परतले आहे. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी बीडच्या सत्र न्यायालयात धाव घेतली असून जामिना अर्ज न्यायालयात दाखल केला आहे.
गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील सुर्य मंदिर संस्थानातील हनुमान महाराज गिरी यांच्यावर चकलांबा पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी तसेच बाललैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गून्हा दाखल आहे. परंतू सदरचा गून्हा हा केवळ ब्लॅकमेलींगसाठी असून गावातील राजकिय पुढारी, पत्रकार यांनी तसेच फिर्यादीच्या नातेवाईक यांनी मला चार लाख रूपयाची मागणी केली होती. ती मागणी पुर्ण केली नाही म्हणून माझ्यावर खोटा गून्हा दाखल केल्याने मी आत्महत्या करत आहे असा व्हिडीओ हनुमान महाराज यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. त्यानंतर हनुमान महाराज गायब होते. महाराज नेमके कोठे आहेत याचा शोध पोलीस यंत्रणा घेत असतांना अखेर महाराज पंढरपूरला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी सुटकेचा निश्‍वास सोडला होता. आता पोलीसांना गुंगारा देणार्‍या हनुमान महाराज गिरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी थेट बीडच्या सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. न्या.के.आर.पाटील यांच्यासमोर हनुमान महाराज गिरी यांचे अटकपूर्व जामिनाचे प्रकरण चालणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!