Uncategorized

सहा दिवसानंतर पुन्हा धारुर बाजार पेठ खुली.

किल्ले धारुर(लोकाशा न्युज) – येथील व्यापाऱ्यांकडुन स्वयंस्फूर्तीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहा दिवस बाजार पेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता .या बंदला चांगला प्रतिसाद मीळाला होता. सहा दिवसानंतर पुन्हा धारुर  बाजापेठ सुरु करण्यात आल्याने नागरीक रस्त्यावर खरेदीसाठी उतरले होते.

शहरात वाढत असलेल्या कोरोनामुळे शहरातील व्यापारी बांधवांनी दि.०६ आॕगष्ट पासुन बाजार पेठ बंद ठेवण्यात आली होती .दि.१२ आॕगस्ट रोजी सहा दिवस झाल्यानंतर १३ आॕगस्ट रोजी पुन्हा बाजार पेठ खुली झाल्याने नागरीक खरेदीसाठी रस्त्यावर उतरले होते. परंतु सकाळपासुनच ढगाळ वातावरण व संततधार असल्याने वातावरणात गारठा पसरला होता.या मुळे व्यावसायही थंड थंड होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!