Uncategorized

गंगाचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या दोन युवकावर काळाचा घाला, दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यु

तलवाडा प्रतिनिधी

तालुक्यातील निपाणी जवळका येथे प्रतिवर्षी प्रमाणे जोतिबाची यात्रा भरते यानिमित्ताने देवास गंगाच्या पाण्याने अभिषेक घातला जातो ते गंगा चे पाणी आणण्यासाठी निपाणी जवळका येथून राजापूर येथे आले असता तेथील दोन तरुण शुक्रवार रात्री बेपत्ता झाल्याची घटना घडली होती,त्यांचे मृतदेह शनिवार रोजी सकाळी गावकऱ्यांच्या हाती लागले.
याविषयी सविस्तर असे की निपाणी जवळका येथील जोतिबा यात्रे निमित्त देवाला गंगाच्या पाण्याने अभिषेक घालण्यासाठी काही तरुण दि.15 रोजी रात्री पाणी आणण्यासाठी राजापूर येथे गेले होते तेथून पाणी घेऊन परत येत असतांना आपल्या सोबत चे मोहन आतकरे वय-17 व शिवाजी इंगोले वय-19 हे दोघे सोबत परत आले नसल्याचे मित्रांच्या लक्षात आले त्यांनतर सहकारी तरुणांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता त्यांना ते आढळून न आल्याने त्यांनी गावकऱ्यांना कळवले गावकरी व मित्रांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला परंतु शोध लागला नसून शनिवार रोजी सकाळी त्या दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले घटनास्थळी पोलीसांना पाचारण करण्यात आले ,पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना साठी प्राथमिक आरोग्य केंद्र तलवाडा येथे आणले असून प्रा.आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले,या घटने मुळे निपाणी जवळका गावावर शोककळा पसरली असून तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!