देश विदेश

टोक्योमध्ये भारताने पहिले रौप्यपदक पटकावले; मीराबाई चानून वेटलिफ्टिंगमध्ये मिळविले दुसरे स्थान, नरेंद्र मोदींसह खा. प्रीतमताईंनी मिराबाईंचे केले अभिनंदन

टोक्यो : भारताची सुपरस्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मोठा इतिहास रचलेला आहे. मीराबाईने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले आहे. भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील भारताला हे दुसरे पदक मिळालेले आहे.
सिडनी ऑलिम्पिक (२०००) मध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. कर्णम मल्लेश्वरीने हे पदक भारताला मिळवून दिले होते. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे. पहिल्या प्रयत्नात मीराबाईने ८४ किलो आणि दुसर्‍या प्रयत्नात ८७ किलो वजन उचलून हा पराक्रम रचलेला आहे. मात्र तिसऱ्या प्रयत्नात ती ८९ किलो वजन उचलण्यात अपयशी ठरलेली आहे. स्नॅच फेरीत तिने दुसरे स्थान पटकावले. ९४ किलो वजनासह चिनी वेटलिफ्टर हौ झीहूने पहिले स्थान मिळवले. यानंतर मीराबाई चानूने आपल्या क्लीन अँड जर्कच्या दुसऱ्या प्रयत्नात ११५ किलो वजन उचलून एक नवीन ऑलिम्पिक विक्रम केला, परंतु चीनच्या हौ झीहूने पुढच्या प्रयत्नात ११६ किलो वजन उचलले. त्यानंतर चानूला झीहूच्या पुढे जाण्यासाठी ११७ किलो वजन उचलण्याची गरज होती, पण ती त्यात अयशस्वी झाली. मीराबाई चानूच्या या पराक्रमावर राष्ट्रपती राम नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार प्रीतमताईंनी ट्विटकरून अभिनंदन केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!