बीड

पोलिस प्रशासन आणि गृह विभागाबद्दल आज जनतेचा विश्‍वास शुन्य झाला, अनिल देशमुखांनी वसूलीसाठी शंभर कोटींच्या दिलेल्या टार्गेटच्या प्रकरणावरून पंकजाताईंचा राज्य सरकारवर घणाघात


बीड, दि. 20 मार्च : ‘‘राजकारणाचं गुन्हेगारीकरण’’ हा विषय आता पुन्हा एखदा ऐरणीवर आला आहे. परमबीरांचं पत्र बघून मन थक्क झालं, अश्‍चर्यचकीत झालं… की या पुरोगामी महाराष्ट्रात हे काय चाललेय, पोलिस प्रशासनाचा, गृह विभागाचा विश्‍वास आज जनतेच्या मनात शुन्य झाला आहे, त्यामुळे राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर मोठ्या प्रमाणावर प्रश्‍न उचलून, जनतेच्या मनातील किंतू परंतू मांडून जनतेला परत एखदा सुरक्षा देण्यासंदर्भात निर्णय विरोधी पक्षाने केला पाहिजे, कारण घडलेला हा विषय अत्यंत संतापजनक, अत्यंत चिंताजनक आहे, महाराष्ट्राच्या भविष्यातील सुरक्षेवर प्रश्‍न चिन्ह निर्माण करणारी परिस्थिती राज्य सरकारमुळे ओढावली आहे. मी याबद्दल चिंता व्यक्त करते, अशी प्रतिक्रीया भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी दिली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!