महाराष्ट्र

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन ?; शिक्षणमंत्री गायकवाड यांनी केले जाहीर

मुंबई,दि.५ (लोकाशा न्यूज) : राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा यंदा ऑफलाईन घेण्यात येणार आहेत असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत जाहीर केले.
भाजप सदस्य सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री श्रीमती गायकवाड यांनी सांगितले की, दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्वाचा विषय असून शिक्षण विभागामार्फत याबाबत विविध मुद्यांवर चर्चा केली जात आहे. त्यानुसार या दोन्ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरविण्यात आले आहे. दहावीसाठी साधारणत: 16 लाख तर बारावीसाठी 15 लाख विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे गेल्यावर्षीचे शैक्षणीक वर्ष अडचणीचे गेले आहे. अद्यापही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देताना परीक्षा कशा पद्धतीने आणि सुरक्षितपणे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असेही त्यांनी उत्तरात स्पष्ट केले. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून 15 मार्च पासून विविध विषयांसंदर्भात माहिती पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. अन्य मंडळांच्या परिक्षांच्या तारखा पाहूनच वेळापत्रक केल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!