बीड

माणसाचं जगणं झालं मुश्किल, भीषण अपघातात नवरा-बायको जागीच ठार

बीड,
ऊसाने भरुन चाललेल्या ट्रॅक्टरच्या मागील ट्रेलरमध्ये कार येऊन धडकल्याने कारमधील पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत. तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्री दीड वाजता भेंड खुर्द नजीक माजलगाव पाथर्डी राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती साखर कारखान्यावर ऊस घेऊन निघालेल्या ट्रकटरला गढी कडन येणाऱ्या कार ने जोराची धडक दिली , कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले कारमधील दोघे पतीपत्नी जागीच ठार झाले ,घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले,परिसरातील नागरिक आणि काही ऊसतोड कामगारांनी ट्रकटर मध्ये घुसलेली कार बाहेर काढली,या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
तर दुस-या झालेल्या अपघातात उभ्या ट्रेलर दुचाकी धडकल्याने एक ठार झाला आहे. हा अपघात घटना सिरसदेवी येथे घडला आहे. बनवस (जिल्हा परभणी) येथील कुटुंब नातलग यांच्या विवाह सोहळ्याला औरंगाबाद येथे एम एच 24 व्ही- 9257 कारने निघाले असताना भेंड खुर्द नजिक समोर ऊसाने भरुन चाललेल्या ट्रॅक्टरच्या ट्रेलरमध्ये कार घुसल्याने कारमधील व्यकंट विश्वनाथ बल्लोरे(वय 60) सुलोचना व्यंकट बल्लोरे (वय 50)हे पती-पत्नी जागीच ठार झाले.

तर अहिल्याबाई बापुराव बल्लोरे,प्रताप अंकुश नळगिरे आणि एक पाच वर्षीय बालक जखमी झाले. जखमीना पुढील उपचारार्थ बीड येथे हलविण्यात आले तर अपघातात ठार झालेले पती-पत्नी यांचे मृतदेह जातेगाव येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यास दाखल करण्यात आले आहे.

सदर घटना बुधवारी मध्यरात्री दिड वाजता घडली. तर सिरसदेवी येथील उभ्या ट्रॅक्टरच्या ट्रेलर ला दुचाकी धडकल्याने दुचाकीवरील एक जण ठार झाल्याची घटना रात्री दहा वाजता घडली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!