Uncategorized

गुड न्यूज !
पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई
पीक पाहणीची नोंद सक्तीची नाही

बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : महाराष्ट्र राज्यात सन 2022-23 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप 2022 मध्ये या योजनेत भाग घेण्याचा अंतिम दि.31 जुलै 2022 असा आहे. शासनाच्या ई – पीक पाहणी मध्ये पीक पेर्‍याची नोंद घेण्याची कार्यवाही 01 ऑगस्ट 2022 पासून सुरु होत आहे . पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ही पिक पाहण्याची नोंद आवश्यक असल्याबाबत काही ठिकाणी शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. पिक विमा योजनेत भाग घेत असताना काही वेळेस पिकाचा विमा काढलेले पीक व प्रत्यक्ष शेतात असलेले पीक यामध्ये तफावत आढळते. अशा परिस्थितीत शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहतो. शेतकर्‍यांनी शेतात घेतलेले पीक व विमा हप्ता भरताना नोंदवलेले पीक यामध्ये काही तफावत आढळल्यास सदर शेतकर्‍याने पीक पाहणी मध्ये केलेली नोंद ही अंतिम गृहीत धरण्यात येईल असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे पिक विमा योजनेत सहभाग घेताना ई पीक पाहणीमध्ये पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही. सदर शेतकरी पिक विमा बाबत स्वयंघोषणा पत्राद्वारे पिक विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो मात्र 01 ऑगस्ट 2022 नंतर त्यांनी ई – पीक पाहणीमध्ये आपल्या पिकाची नोंद करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!