बीड गेवराई

‘त्या’ महिलेचा अनैतिक संबंधातून खूनच ? ओळख पटली, जालना जिल्ह्यातील महिला असल्याचे झाले निष्पन्न

गेवराई:- गेवराई जवळ असलेल्या रांजणी येथील एका नाल्यात महिलेचा सांगडा आज सकाळी आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या महिलेचा मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने ओळख पटली नव्हती. मात्र पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता सदरील महिला जालना जिल्ह्यातील असून राधा माणिक गायकवाड ( वय ३५ ) रा. इंदेवादी ता.जि. जालना असे या मयत महिलेचे नाव असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान सदरील महिलेचा अनैतिक संबंधातून खूनच झाला असून यानंतर हा मृतदेह रांजणी जवळ आणून टाकला असल्याची शक्यता असून पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत. जालना पोलिसात दि.२२ सप्टेंबर रोजी सदरील महिलेची मिसिंगची तक्रार दाखल आहे.
धुळे-सोलापूर महामार्गावरील गेवराई हद्दीतील रांजणी येथील ग्रामस्थांना परिसरात दुर्गंधी सुटल्याने त्यांनी पाहणी केली असता शनिवारी रात्री गावालगत सर्विस रोडच्या एका नाल्यात मयत महिलेचा सांगडा आढळून आला. यानंतर याची माहिती गेवराई पोलिसांना दिल्यानंतर गेवराई पोलिसांनी घटनास्थळी जावून घटनेचा पंचनामा केला. तसेच सदरील महिलेचा मृतदेह शवविछेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. दरम्यान सदरील महिलेचा खून करुन रांजणी जवळील निर्मनुष्य ठिकाणी हा मृतदेह आणून टाकला असण्याची शक्यता होती.
याप्रकरणी गेवराई पोलिसांनी अधिक माहिती मिळवली असता सदरील मयत महिलेची जालना पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद दि.२२ सप्टेंबर दाखल होती. यावरून जालना पोलिस व मयत महिलेचे नातेवाईक गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आले. यानंतर त्यांनी साडी, कानातले, पैजन या दागिनण्यावरून मयत महिलेची ओळख पटवली. शवविछेदन व डीएनए करण्यासाठी शव अंबोजोईला रवाना करण्यात आले आहे. या प्रकणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदिप काळे करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!