परळी, सामाजिक समानतेसाठी आरक्षणाची सुरुवात करून छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील असमानतेची दरी कमी केली होती,स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने ही दरी पुन्हा एकदा वाढली आहे.आमचा लढा याविरुद्ध आहे !
आरक्षणाचे जनक छ.शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करून मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने ओबीसींच्या न्याय हक्कासाठी मा.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात आम्ही रस्त्यावर उतरत आहोत.
ओबीसींचे आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी,सामाजिक समानता,न्याय आणि बंधुत्व अबाधित राखण्यासाठी चक्काजाम आंदोलनाला सुरुवात करत आहोत, असे खासदार प्रीतमताईं नी म्हटले आहे.