बीड आष्टी

आ. सुरेश धस यांनी मागणी करताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ऑन द स्पॉट प्रश्न मार्गी लावला

आष्टी, शिरूर कासार तालुक्याचा रेल्वे रॅक पॉईंट अहमदनगरला होणार

बीड – आष्टी व शिरूर तालुक्यासाठी परळी रेल्वे स्टेशनचा रॅक पॉईंट हा अहमदनगर येथे बदलून द्यावा अशी मागणी काल बीड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत आ सुरेश अण्णा धस यांनी करताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ कृषी आयुक्तांना फोन करून याबाबत आदेश काढण्याचे आदेशात केले.
आष्टी व शिरूर कासार तालुक्यासाठी अहमदनगर येथे रॅक पॉईंट होणे अतिशय आवश्यक आहे. रेल्वेने येणारे खते-बी बियाणे लवकर उपलब्धता आदींसाठी रॅक पॉईंट अहमदनगर येथे बदलून मिळाल्याने आष्टी व शिरूर तालुक्याच्या सोयीचे ठरणार आहे. आ सुरेश अण्णा धस यांच्या पाठपुराव्यामुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑन द स्पॉट प्रश्न मार्गी लावत कृषी आयुक्तांना आदेशीत करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!