बीड

चंद्रकांत पाटील सूर्यावर गरळ ओकण्या अगोदर आपली अवकात ओळखा- सुभाष राऊत


बीड / प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे ओबीसी नेते ना.छगनराव भुजबळ साहेबांनी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केली आहे. त्यांच्यावर गरळ ओकणे म्हणजे सूर्यावर गरळ ओखण्यासारखे आहे. चंद्रकांत पाटलांनी आपली लायकी आणि अवकात ओळखून बोलताना तारतम्य पाळावे अन्यथा समता सैनिक त्यांच्या अंदाजामध्ये चोख उत्तर देतील असा सज्जड इशारा महात्मा फुले समता परिषदेचे मराठवाडा तथा बीड जिल्हा अध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अॅड. सुभाष राऊत यांनी म्हटले आहे की, चंद्रकांत पाटील यांनी देशाचे ओबीसी नेते ना.छगनराव भुजबळ यांच्यावर बोलताना तारतम्य पाळावे. उचलली जीभ लावली ओठाला असे विधान करू नये. ना. छगनराव भुजबळ यांनी केलेले प्रत्येक विधान अभ्यासपूर्ण असते, खोट्या गुन्ह्यांमध्ये बोलावून घेऊन अटक करणे म्हणजे खूप मोठे मर्दानगीचे काम नाही. ना. छगनराव भुजबळ आजही आणि कालही धुतल्या तांदळासारखे शुभ्र आहेत. आज बोललात, यापुढे असे विधान केले तर बीड जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील समता सैनिक तुम्हाला रस्त्याने फिरू देणार नाही. दुसरी बाब भुजबळ साहेबांना धमक्या देण्यासाठी आज पर्यंत कोणी निर्माण झाला नाही. तुम्ही धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर समता सैनिक तुम्हाला माफ करणार नाहीत. त्यामुळे चंद्रकांत पाटील साहेब असे फालतू विधान या पुढे करू नका असा धमकीवजा इशारा अॅड. सुभाष राऊत यांनी दिला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!