महाराष्ट्र

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्या, मेहबूब शेख यांची गृहमंत्र्यांकडे मागणी


मुंबई, दि. 26 (लोकाशा न्यूज) : एमपीएससीच्या विद्यर्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्या, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

शुक्रवारी मुंबई येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सदर मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांना दिले, विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांच्याकडे केली. विद्यार्थीना भविष्यात अडचणीत येऊ नये ही अपेक्षा व्यक्त केल्यानंतर ना. जयंत पाटील व ना. अनिल देशमुख यांनी तातडीने गुन्हे मागे घेऊ व विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही असा शब्द दिला. यावेळी ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी खा. आनंद परांजपे उपस्थीत होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!