बीड

ना. धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची केली पाहणी, तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना, कृषी मंत्र्यांसमोर जयसिंग भैय्या सोळंके यांनी मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा


बीड,

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला ब्रेक देत भर पावसात धारूर तालुक्यातील चोरंबा, सोनीमोहा, आंबेवडगाव आदी गावांना भेटी देऊन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या आंबा, डाळींब, मिरची, टोमॅटो आदी पिकांची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांना दिलासा दिला. दरम्यान यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयसिंग भैया सोळंके यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून त्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी केली.

अवकाळीने फळांची व भाज्यांची पडझड झाली असून मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्याचे अहवाल राज्य शासनाकडे तातडीने पाठवावेत, अशा सूचना यावेळी धनंजय मुंडे यांनी केल्या.

तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना
मागील दोन तीन दिवसात सातत्याने बीड जिल्ह्यात बहुतांश भागात अवकाळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट झाली आहे. यामुळे आंबा, डाळिंब, यांसह मिरची, टोमॅटो, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी पंचनामे झाले आहेत, तर उर्वरित ठिकाणचे पंचनामे तातडीने पूर्ण केले जावेत व मदतीचे अहवाल शासनाकडे सादर करण्यात यावेत. तसेच, ज्या शेतकऱ्यांनी फळपिकविमा भरलेला आहे, त्यांनी नुकसानीचे रिपोर्ट संबंधित कंपनीकडे ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. जेणेकरून शेतकऱ्यांना दुहेरी मदत होईल, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!