महाराष्ट्र राजकारण

तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की करून असंसदीय वर्तवणूक करणार्‍या भाजपाच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या चर्चेचं पर्यवसान आधी शाब्दिक वादात, आरोप-प्रत्यारोपात, नंतर गदारोळात आणि पुढे अक्षरशः राड्यात झाल्याचे पाहायला मिळाले. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले. सभागृहाचे कामकाज सुरु असताना सत्ताधारी पक्षाचे सदस्य बोलू लागताच भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. विधिमंडळात मध्येच बोलले म्हणून अनिल देशमुख आता आतमध्ये जात आहेत, हे मुनगंटीवार यांचे वक्तव्य धमकी देणारे आहे. सभागृहातच धमकी देण्यापर्यंत मजल भाजपाची गेली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून ईडी, आयकर, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजपा विरोधी पक्षांच्या लोकांना नाहक त्रास देत असल्याची ही कबुलीच आहे. हा सत्तेचा दुरुपयोग असून महाराष्ट्रात हा खेळ केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून भाजपाने चालवला आह


या 12 आमदारांना करण्यात आले निलंबित
भाजपच्या ज्या 12 आमदारांना निलंबित केले आहे, त्यांच्यामध्ये पराग अलवानी, राम सतपुते, संजय कुटे, आशीष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंगळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे आणि किर्तीकुमार भंगडिया यांचा समावेश आहे.
पावसाळी अधिवेशनात सरकार यावेळी एकू तीन प्रस्ताव आणणार आहे. यामध्ये कृषी कायद्यांचा विरोध, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्राचा हस्तक्षेप आणि राजकीय ओबीसी आरक्षणाचा समावेश आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!