बीड

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी गुरुवारी समता परिषदेचे भव्य आक्रोश आंदोलन, जिल्ह्यातील सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरणार – अॅड.सुभाष राऊत

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी गुरुवारी समता परिषदेचे भव्य आक्रोश आंदोलन
जिल्ह्यातील सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरणार – अॅड.सुभाष राऊत
बीड / प्रतिनिधी
ओबीसींचे राजकीय आरक्षण घटनात्मक अटींच्या पुर्ततेअभावी स्थगित करण्यात आले आहे. आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा सामूहिक निर्णय परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. छगनराव भुजबळ साहेब यांच्या आदेशानुसार गुरुवार दि.१७ जून २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपास चौक, जालना रोड, बीड येथे भव्य आक्रोश आंदोलनाचा एक भाग म्हणून रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांनी दिली असून या रास्ता रोको आंदोलनात ओबीसी राजकीय आरक्षणाचे लाभार्थी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक यांच्यासह ओबीसी समाज बांधवांनी आणि समता परिषदेच्या पदाधिकारी व समता सैनिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन देखील अॅड. सुभाष राऊत यांनी केले आहे.
राज्यातील पाच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण विरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील २७ महानगरपालिकेच्या एकूण २७३६ जागांमधून ७४० जागा कमी होत आहेत. १२८ नगरपंचायतीं व २४१ नगरपालिकामधल्या ७४९३ जागांपैकी २०९९ जागा कमी होणार आहेत. ३४ जिल्हापरिषदेतील २००० जागांपैकी ५३५ जागा तर ३५१ पंचायत समितीमध्ये ४००० जागांपैकी १०२९ जागा कमी होणार आहेत २७७८२ ग्रामपंचायत मध्ये अंदाजे १,९०,६९१ जागांपैकी ५१४८६ जागा ह्या ओबीसी समाजाच्या कमी होत आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचा कोणताही परिणाम हा नोकरी अथवा शैक्षणिक आरक्षणावर होणार नसला तरीही राजकीय आरक्षण रद झाले आहे. याचा परिणाम फक्त राज्यावरच नाही तर सर्व देशात होणार आहे. यामुळे आता सर्व ओबीसी संघटनांनी एकत्रित लढा देण्याची गरज आहे.
तसेच आरक्षणाच्या प्रश्नावर लोकांच्या मनात संभ्रम आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करून लोकांची जनजागृती करण्याची गरज आहे. यात सर्व ओबीसी संघटना व समता परिषदेच्या कार्यकत्यांनी एकत्र यावे व सरकारला आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांनी केले आहे.
ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करण्याची हाक समता परिषदेने दिली आहे. त्यानुसार दि.१७ जून २०२१ पासून बीड जिल्ह्यात भव्य आक्रोश आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याचाच एक भाग म्हणून गुरुवार रोजी सकाळी ११:०० वाजता धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपास चौक, जालना रोड, बीड येथे मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात ओबीसी राजकीय आरक्षणाचे लाभार्थी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक यांच्यासह ओबीसी समाज बांधवांनी आणि समता परिषदेच्या पदाधिकारी व समता सैनिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन अॅड. सुभाष राऊत यांनी केले आहे.
सदरील आंदोलन शासन आणि कोरोना महामारी नियमांचे पूर्णतः पालन करून लोकशाही मार्गाने करण्यात येणार असून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्यात येणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!