बीड

पाचनंतर संचारबंदी, जरा भान ठेवा! विनाकारण बाहेर फिरू नका, मास्क वापरा, पुन्हा कडक निर्बंधाची वेळ येऊ देऊ नका – जिल्हाधिकारी


बीड, दि.15 : सद्यस्थितीत जिल्हामध्ये कोवीड 19 च्या अनुषंगाने शासन निर्देशानुसार लेवल -3 चे निबंध लागु आहेत, सदरील निबंधामध्ये अत्यावश्यक तसेच इतर सेवा देणाऱ्या आस्थापना दैनंदिन सुरु असल्याने जिल्हयातील विविध शहरांमधील बाजारपेठांमध्ये मोठया प्रमाणावर वर्दळ वाढलेली दिसुन येत आहे . जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन दैनंदिन प्राप्त होणाऱ्या दैनिक अहवालावरुन असे निर्दशनास येते की , जिल्हयामध्ये दि . 10,06,2021 रोजी 168 रुग्ण , दि . 11.06.2021 रोजी 130 रुग्ण , दि . 12.06.2021 रोजी 180 रुग्ण , दिनांक 13.6.2021 रोजी 108 रुग्ण व दि . 15.06.2021 रोजी 154 रुग्ण कोबीड रुग्ण आढळुन आलेले आहेत . सद्यस्थितीत निबंधामध्ये शिथीलता असल्या कारणाने शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक कोवीड योग्य वर्तन ‘ ( Covid Appropriate Behaviour ) चे पालन करत नसून बाजारपेठांमध्ये विनाकारण फिरत असल्याने , शासकीय कार्यालयामध्ये समुहांमध्ये गर्दी करत असल्याने , आवश्यकता नसताना रस्त्यांवर समुहांमध्ये उभे राहणे , मास्क चा वापर न करता बाहेर फिरणे इ . कारणांमुळे रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे . सद्यस्थितीत बाजारपेठांमध्ये नागरिक सामाजिक अंतर ( Social Distancing ) , सॅनिटायझर चा वापर व मास्कचा वापर कमी प्रमाणात करत असुन यामुळे भविष्यात पुन : श्च कड़क निबंधाची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही . सबब जिल्हयातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की , सर्वानी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे , शहरांमधील बाजारपेठांमध्ये आवश्यकता असेल तर बाहेर पडावे , सर्व आस्थापनाधारकांनी त्यांच्या आस्थापनांमध्ये सामाजिक अंतर ( Social Distancing ) , सॅनिटायझर चा वापर व मास्कचा वापर आवश्यक करावा . नागरिकांनी विनाकारण गर्दीमध्ये जाणे टाळावे , सरकारी कार्यालयांमध्ये विनाकारण समुहांमधील वावर टाळावा . रेस्टॉरंट , हॉटेल या केवळ 50 टक्के उपस्थितीमध्येच निर्देशित केलेलया वेळेत चालु ठेवण्यात याव्यात . अन्यथा संबधित रेस्टॉरंट , हॉटेलवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल . यापुढे रुग्ण संख्यावाढीचा आलेख वाढत राहिल्यास , नागरिकांना कठोर नियमांना सामोरे जावे लागेल तसेच कोवीड -19 विषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निर्दशनास आल्यास संबधितांवर शासन नियमाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी . सर्व व्यापारी वर्गानी निर्देशित केलेल्या वेळेत दुकाने उघडावी तसेच संध्याकाळी 05.00 नंतर अत्यंत आवश्यकता असेल तरच ( वैद्यकीय कारणास्तव ) घराबाहेर पडावे . संध्याकाळी 05.00 नंतर संचारबंदी लागु आहे याचे देखील सर्व नागरिकांनी भान ठेवावे . रुग्ण संख्या , रुग्ण वाढीचा दर ( Positivity Rate ) वाढल्यास शासन निर्देशानुसार जिल्हा जर स्तर 3 ( level – 3 ) मधुन स्तर 4 ( level – 4 ) मध्ये गेल्यास सर्व नागरिकांना पुन्हा कडक निबंधाना सामोरे जावे लागेल याची नोंद सर्वानीच घ्यावी , असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!