बीड

..तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, मजूर, उद्योजक, व्यापार्‍यांना विश्‍वासात घ्या – पंकजाताई


बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : कोरोनामुळे सध्या परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. याचा प्रत्येकाला त्रास सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे गरिबांची, व्यापारांची, इकॉनॉमीची परिस्थिती कठीण होईल, तरी पर्याय काय आहे? कोरोनाची साखळी कशी तोडणार? मजुर, उद्योजक, व्यापारी नोकरदारांना विश्वास देणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणेवरील भार हा गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.
कोरोनाची दुसरी लाट गतीने पसरत आहे, याचा त्रास प्रत्येक नागरिकांना सहन करावा लागत आहे. ही लाट रोखण्यासाठी लॉकडाऊन केले जात आहे. मात्र लॉकडाऊनमुळे कोरोना थांबणार आहे का? असे एक ना अनेक प्रश्‍न पडत आहेत. यावर माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. लॉकडाऊनमुळे गरिबांची, व्यापार्‍यांची इकॉनॉमीची परिस्थिती कठीण होईल, तरी पर्याय काय आहे? कोरोनाची साखळी कशी तोडणार ? मजूर, उद्योजक, व्यापारी आणि नोकरदारांना विश्‍वास देणे अत्यंत आवश्यक आहे, आरोग्य यंत्रणेवरील भारही गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे पंकजाताईंनी म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!