बीड

पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव प्रयत्नशील राहणार-आ. पंकजाताई मुंडे यांनी दिला विश्‍वास, दिक्षाभुमी ते मंत्रालयापर्यंत काढण्यात आलेल्या यात्रेचा मुंबईत झाला समारोप


मुंबई, दि. 20 (लोकाशा न्यूज) : पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्‍वास माजी मंत्री तथा विद्यमान आ. पंकजाताई मुंडे यांनी बोलून दाखविला आहे. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचेप्रमुख वसंत मुंडे यांच्यासह राज्यातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्या सरकारकडे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दीक्षाभूमी ते मंत्रालय अशा पत्रकार संवाद यात्रा काढण्यात आली होती, ही यात्रा पत्रकारांच्या प्रश्‍नांसाठी सदैव लढा देणारे वसंत मुंडे व संतोष मानुरकर यांच्या पुढाकारातून काढण्यात आली होती, त्यानुसार या यात्रेचा समारोप बुधवारी मुंबईतील  यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला. या कार्यक्रमास राज्याच्या तात्कालिन मंत्री तथा विद्यमान आ. पंकजाताई मुंडेंनी उपस्थित राहून राज्यभरातून आलेल्या पत्रकार व उपस्थितांशी संवाद साधला. पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलेले आहे  व भविष्यातही राहील, असे सांगून पत्रकार संघाच्या यशस्वी वाटचालीस यावेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!