बीड

वाचाळवीर आ.रोहित पवारांच्या बापू आंधळे हत्या प्रकरणातील असंवेदनशील वक्तव्याचा निषेध; बुधवारी परळी बंद, तरुण सरपंचाची निर्घृण हत्या झाली, रोहित पवारांचे मात्र चामडी बचाव आणि राजकीय पोळी भाजण्याचे धोरण

परळी वैद्यनाथ (दि. 02) – 29 जून रोजी परळी वैद्यनाथ शहरात सबंध बीड जिल्ह्याला हादरवणारी घटना घडली. धनंजय मुंडे समर्थक व मरळवडीचे सरपंच असलेले बापूराव आंधळे यांची डोक्यात गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. तसेच आणखी एक तरुण गोळीबारात जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणात पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला असून ते तपास करत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वाचाळवीर आमदार रोहित पवार यांना स्वतःची व आपल्या पक्षाची कातडी वाचवायची इतकी घाई झाली आहे की, ते मयत बापू आंधळे व त्याच्या कुटुंबविषयी सहनुभीती दाखवायचे सोडाच, उलट या निर्घृण हत्येतील आरोपीची पाठराखण करत असून, धनंजय मुंडे यांची व परळीची बदनामी करत सुटले आहेत. त्यांचे हे वर्तन अत्यंत असंवेदनशील व निषेधार्ह असून, याविरिद्ध बुधवार दि. 03 जुलै रोजी परळी शहर बंदची हाक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

एका तरुणाची निर्घृण हत्या झाली, आणखी एक जण मृत्यूशी झुंज देत आहे. त्याबद्दल कोणतीही संवेदनशीलता न दाखवता केवळ राजकारण मध्ये आणून आरोपीचे समर्थन करायचे इतकेच नाही तर उलटपक्षी परळीची आणि आमच्या नेत्यांची बदनामी करायची, हे वाचाळवीर रोहित पवारांना शोभत नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

दरम्यान, उद्या बुधवार दि. 03 जुलै रोजी परळी शहर पूर्णपणे बंद असणार असून याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयास देण्यात आले आहे. तसेच सर्व व्यापारी बांधवांनी व नागरिकांनी या बंदला सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष गोविंद कराड व पदाधिकारी यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!