बीड

शेतात मशागत करत असताना विजेच्या खांब्याला धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैल ठार, संगम येथील धक्कादायक घटना

दिंद्रुड प्रतिनिधी
शेतात कोळपणी करत असताना विजेचा तीव्र धक्का बसल्याने शेतकरी व दोन बैल ठार झाल्याची घटना १ जुलै सोमवार रोजी दुपारी बारा वाजे दरम्यान माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड शिवारात गट क्र. ७०८ मध्ये घडली.
बालासाहेब बाबासाहेब डापकर (वय ४० वर्ष) रा.संगम ता. धारूर असे मयत शेतकऱ्याचे नाव असून सकाळी ११ वाजे दरम्यान शेतात कोळपणी करत असताना दोन सालगड्यांसह बालासाहेब डापकर शेतात असलेल्या विजेच्या खांबा जवळील तान दिलेल्या तारेला लोखंडी कोळपे असलेल्या दांडीचा स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसला. या घटनेत सालगडी कृष्णा बबन सोनवणे व पुतण्या रवी मनोहर डापकर जवळपास पाच ते दहा फुटापर्यंत फेकले गेले तर यावेळी शेतकरी बालासाहेब डापकर यांना व दोन्ही बैलांना विजेचा तीव्र धक्का बसल्याने जागेवर मयत झाले. माजलगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी प्रेतास पाठवले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!