बीड

नामदेवराव दादा क्षीरसागर यांच्या निधनाने जिल्ह्यातील एक प्रखर सामाजिक चळवळ आज शांत झाली – धनंजय मुंडे

मुंबई (दि. 01) – दै. चंपावती पत्र चे संपादक तथा बीड जिल्ह्याच्या पत्रकारितेतील भीष्म पितामह नामदेवराव दादा क्षीरसागर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले असून नामदेवराव दादा यांच्या दुःखद निधनाने बीड जिल्ह्यातील एक प्रखर सामाजिक चळवळ आज शांत झाली, अशा शब्दात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शोक व्यक्त केला आहे.

बीड जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक रेल्वे मागणी कृती समितीचे निमंत्रक म्हणून नामदेवराव दादा क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्याच्या महत्त्वकांक्षी अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गाच्या कामासाठी अनेक वर्षांपासून मोठी चळवळ उभी केली होती. बीड जिल्ह्याच्या पत्रकारितेतील भीष्मपितामह तसेच चंपावती रत्न अशी देखील नामदेवराव दादा क्षीरसागर यांची महती होती.

आज वयाच्या 83 व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले असून आपल्यासाठी ज्येष्ठ मार्गदर्शक व आदर्श असे व्यक्तिमत्व असलेले नामदेवराव दादा क्षीरसागर यांच्या निधनाबद्दल मी दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण करतो, तसेच क्षीरसागर परिवार व दैनिक चंपावती पत्र परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे व नामदेवराव क्षीरसागर यांच्यात अखेरची भेट झाली तेव्हा सुद्धा बीड रेल्वे यांसह बीड जिल्ह्यातील विकासकामांच्या संदर्भातच दादांनी श्री मुंडे यांच्याशी चर्चा केली होती.

https://www.facebook.com/share/p/7g2CfCFWp6EGbJH4/?mibextid=oFDknk

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!