बीड

शेतकर्‍यांना चांगले दिवस येणार, देशाच्या कृषी मंत्र्यांची धुरा शिवराजसिंह चौहान यांच्या हातात, गडकरींकडे पुन्हा रस्ते-परिवहन मंत्रालय तर अमित शाह देशाचे गृहमंत्री


दिल्ली, दि. 10 (लोकाशा न्यूज) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदी यांच्यासह एनडीएच्या 72 खासदारांनी मंत्रिपदाची आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मोदी यांच्या शपथविधीनंतर खातेवाटपाबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे दावे केले जात होते. मोदींच्या तिसर्‍या टर्ममध्ये कुणाला कोणतं खातं देण्यात येतं? याबाबत उत्सुकता होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोदी सरकारकडून खातेवाटप करण्यात आलं आहे. त्यानुसार येत्या काळात देशातील शेतकर्‍यांना चांगले दिवस येणार आहेत, कारण देशाच्या कृषी मंत्रालयाची धुरा  शिवराज सिंह चौहान (कृषी आणि किसान कल्याण, पंचायत तथा ग्रामविकास मंत्रालय) यांच्या हाती सोपविण्यात आली आहे.
देशाच्या राजकारणातील सध्याच्या घडीतील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. देशाच्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची सोमवारी पहिली बैठक पार पडली. या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 3 कोटी गरिबांना घरे देण्याचा निर्णय झाला. या बैठकीनंतर आता सूत्रांकडून मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रस्ते विकास आणि परिवहन खातं देण्यात आलं आहे. अमित शाह यांना गृहमंत्रीपद देण्यात आलं. तर राजनाथ सिंह यांना संरक्षणमंत्री देण्यात आलं आहे. तर एस जयशंकर यांना परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आलं आहे. अश्विनी वैष्णव यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालय देण्यात आलं आहे.

मोदी सरकारचं खातेवाटप
राजनाथ सिंह – संरक्षण, अमित शाह – गृह, अश्विनी वैष्णव – माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एस. जयशंकर – परराष्ट्र, नितीन गडकरी -परिवहन, रस्ते विकास, अजय टमटा – परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री, हर्ष मल्होत्रा – परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री, मनोहरलाल खट्टर – ऊर्जा आणि शहर विकास मंत्रालय, शिवराज सिंह चौहान – कृषी आणि किसान कल्याण, पंचायत तथा ग्रामविकास मंत्रालय, जीतन राम मांझी – लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय, निर्मला सीतारमण – अर्थ मंत्रालय, सीआर पाटील – जलशक्ती मंत्रालय, जे. पी. नड्डा – आरोग्य मंत्रालय, चिराग पासवान- क्रीडा, किरेन रिजिजू – संसदीय कार्य, मनसुख मांडविया – कामगार, श्रीपाद नाईक – ऊर्जा राज्यमंत्री, अनुपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास, राम मोहन नायडू – नागरी उड्डाण, सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग, शांतनू ठाकूर – पोर्ट शिपिंग राज्यमंत्री, शोभा करंदलाजे – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री, धर्मेंद्र प्रधान – शिक्षण, एचडी कुमार स्वामी – अवजड उद्योग, शोभा करंदलाजे – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री, ज्योतिरादित्य सिंधिया – टेलिकॉम, भूपेंद्र यादव -पर्यावरण, प्रल्हाद जोशी – ग्राहक संरक्षण,
रवनीत बिट्टू – अल्पसंख्याक राज्यमंत्री, गजेंद्र शेखावत – कला, पर्यटन, सांस्कृतिक, सुरेश गोपी – कला, पर्यटन, सांस्कृतिक राज्यमंत्री आणि पीयूष गोयल यांना वाणिज्य मंत्रालयाची धुरा देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील 2 खासदारांना कॅबिनेट
मंत्रीपद आणि 4 खासदारांना राज्यमंत्रीपद
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 2 खासदारांना कॅबिनेटमंत्री करण्यात आलं आहे. तर 4 खासदारांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. यामध्ये एक स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपद आहे. महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. तर रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. तर शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार देण्यात आलं आहे. दरम्यान, अजित पवार गटाच्या एकाही खासदारा मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!