बीड

बीडमधील महासंस्कृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन, सुपरस्टार मकरंद अनासपुरेंनी स्थानिक व्यवसायिकांच्या उभारीकडे बीडकरांचे लक्ष वेधले, म्हणाले, महासंस्कृती महोत्सवात आपली संस्कृती उजळून निघावी, महाराष्ट्रातील समृद्ध संस्कृती वारसा जोपासणे आवश्यक – आयुक्त आर्दड, महोत्सवाचा बीडकरांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा – कलेक्टर दिपा मुधोळ


बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी महाराष्ट्राचे सुपरस्टार मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते मोेठ्या थाटात करण्यात आले. यावेळी त्यांनी स्थानिक व्यवसायिकांच्या उभारीकडे संपूर्ण बीडकरांचे लक्ष वेधून घेतले. या महोत्सवात आपली संस्कृती उजळून निघावी, असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. तसेच तरुण पिढीला स्थानिक लोककलांची, खाद्य संस्कृतीची ओळख होण्यासाठी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन महत्वाचे असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी केले. तर आपल्या प्रस्ताविक भाषणात महोत्सवाची पुर्ण माहिती देवून या महोत्सवाचा बीडकरांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन बीड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी केले.
       पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, ग्रामविकास विभाग, कृषी विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महासंस्कृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन दि.24 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिध्द सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी पद्मश्री बशीर मामू, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीतादेवी पाटील, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, विकास उपायुक्त सुरेश बेदमूथा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून व दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी महिला स्वयंसहायता बचत गटातर्फे निर्मित विविध वस्तू व खाद्यपदार्थाच्या, कृषी विभागाकडून लावण्यात आलेल्या दालनाला मान्यवरांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावेळी विशेष सत्कार पद्मश्री शब्बीर मामू, यांच्यासह जागतिक स्तरावर खेळातील उत्कृष्ट कामगिरी केलेले थलेटिक्स अविनाश साबळे, क्रिकेट सचिन संजय धस, तायक्वांदो नयन अविनाश बारगजे व अविनाश पांचाळ आदि खेळाडू, प्रशिक्षक तसेच खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांचा गौरव करण्यात आला.  श्री. आर्दड पुढे म्हणाले की, आपला सांस्कृतिक वारसा हा येथे सर्व समाजातील या संस्कृतीचा पाया सशक्त असा आहे तो इथल्या खान्या-पिण्यातून आणि जगण्यातून दिसतो. त्यामुळेच्या आपल्या आधिच्या पिढीतील लोक वागण्या बोलण्यातून संतुलित अशी असायची हीच लोप पावत असलेली सशक्त संस्कृती महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून पुन्हा लोकांसमोर उभी करण्याचा मानस आहे. या महोत्सवात लोक पावलेली खाद्य संस्कृती सोबतच लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा मंच शासनाने उभा करुन दिला आहे. अधिकाधिक लोकांनी या महोत्सवात येवून मनोरंजनासोबत खाद्य संस्कृती आणि लोककलांचा आनंद लुटावा, असे आवाहनही त्यांनी केले. महासंस्कृती महोत्सवात आपली संस्कृती उजाळून निघावी, असे उद्घाटनाप्रसंगी प्रमुख उद्घाटक म्हणून लाभलेले सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, स्थानिक उत्पादने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असला पाहिजे, बचत गटाच्या महिलांनी दर्जेदारपणे बनविलेले पिढी जात पदार्थ खरेदी करून त्याचा स्वाद घ्यावा, पूर्वी गावात निर्मित होणारा  माल गावातच विकला जायचा त्यामुळे स्थानिक व्यवसायांना उभारी मिळत असे.  त्यामुळे महासंस्कृती महोत्सवातील विविध स्टॉल वरील पदार्थ केवळ न बघता खरेदी करावीत, असे आवाहनही त्यांनी आवर्जून केले. आपला अंशतः सहभाग व्यवसाय उभारणीसाठी महत्त्वाचा आहे, भगिनींचे प्रॉडक्ट विकत घेऊन त्यांचा व्यवसाय वाढवावा, तरी महासंस्कृती महोत्सवाचा उपक्रम अतिशय स्वागतार्ह आहे असेही त्यांनी सांगितले. तसेच स्टॉलवरील स्वयंसहायता बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थाची आवर्जून खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी केले.  बीड शहरात आगळावेगळा महा संस्कृती महोत्सव पुढील पाच दिवस छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेला आहे. या महोत्सवासस्थानी कलाकारांना मंच तर व्यवसायिकांना स्टॉलची उभारणी करून देण्यात आलेली आहे. स्थानिक कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. महोत्सवात बीड जिल्ह्याचे नाव ज्यांनी उंचावर नेले अशा व्यक्तींचा सत्कार व सन्मान या ठिकाणी केला गेला. महोत्सवात 200 बचत गटांचे स्टॉल, कृषी स्टॉल लावण्यात आले असून शेतकर्‍यांनी व नागरिकांनी महासंस्कृती महोत्सवा उपस्थित रहावे, असे आवाहनही  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला  चंपावती विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. तर यावेळी स्थानिक लोक कलावंतांनी यात कन्या भृण हत्या विरोधी  जाकरुकता पसरवणारा जोगवा, गोंधळ, वासूदेव, पोवाडा, आणि जागो हिंदुस्थानी ग्रुप यांचा देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात सादर करण्यात झाला.

गावागावांना समृध्द करणारे अनासपुरे
बीडकरांच्या गळ्यातील ताईतच
सुपरस्टार मकरंद अनासपुरे आणि बीड जिल्हावासियांचे नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत. ते आपल्या अभिनयातून बीडसह संपूर्ण महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवत आहेत, एक सुपरस्टार म्हणून त्यांच्याकडे उभा महाराष्ट पाहत आहे, एवढेच नव्हे तर त्यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातूनही मोठे काम उभे केलेले आहे. आतापर्यंत 463 कोटी लिटरचे काम त्यांनी उभे केलेले आहे, सध्या 75 गावात कामे सुरू आहेत. यामुळे बीड जिल्ह्याला मोठा आधार मिळत आहे. त्यांचा अभिनय असो की गावागावांना समृध्द करण्याचे त्यांचे काम असो, यामुळे मकरंद अनासपुरे बीड जिल्हवासियांच्या गळ्यातील खर्‍या अर्थाने ताईतच बनलेले आहेत. त्यांना हा बीड जिल्हा कधीच विसरू शकत नाही, एवढे त्यांचे काम मोठे आहे.

जिल्हाधिकार्‍यांकडून कर्तव्याचा
एक एक गड सर
एक मागास जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याकडे पाहिले जाते, आपल्या बीड जिल्ह्याची हीच ओळख पुसण्याचे काम आज बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ ह्या करीत आहेत. प्रत्येकाच्या प्रश्‍नांना न्याय देण्याचे काम तर त्यांच्याकडून तात्काळ होतच आहे, याबरोबरच त्या विकास कामांनाही प्रचंड प्रमाणात गती देत आहेत. त्याचबरोबर जिल्ह्याचे सांस्कृतीक आणि सामाजिक ऐक्य जपण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून पुर्णपणे होत आहे, त्यांच्याच उत्कृष्ट नियोजनात बीडमध्ये महा संस्कृती महोत्सव होत आहे, हा महोत्सव बीडकरांसाठी एक पर्वणीचा ठरणार आहे. याचबरोबर यातील कृषी महोत्सव असो की उमेद अंतर्गत सरस महोत्सव, याही महोत्सवाचा बीडमधील शेतकर्‍यांसह महिला उद्योजकांना मोठा फायदाच होणार आहे. यावरूरच अशा प्रकारे जिल्ह्याच्या हितासाठी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ ह्या कर्तव्याचा एक एक गड खर्‍या अर्थाने सर करत असल्याचे पहायला मिळत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!