Site icon लोकाशा-बंब न्यूज

पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेत बीड जिल्ह्यातील पाच गावांना प्रत्येकी एक लाखाचे पारितोषिक

बीड दि.12 ( प्रतिनिधी ) आमिर खान यांनी पानी फाऊंडेशनची कल्पना मांडली. इतकेच नव्हे तर पाणी फाऊंडेशनने सातत्य दाखवत जलसंधारण अणि शेतकऱ्यांना समर्थ करण्याचे कार्य केले आहे. आधी वॉटर कपच्या माध्यमातून जलस्वयंपूर्ण गावे तयार केली. आता फार्मर कप च्या माध्यमातून विषमुक्त शेती आणि शेतकऱ्यांचे गट तयार करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याचे सुंदर मॉडेल तयार केले आहे. पानी फाऊंडेशनने शेती क्षेत्रात क्रांती आणली असल्याचे गाैरवोदगार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. पानी फाउंडेशनचा राज्यस्तरीय फार्मर कप 2022 हा प्रथम पुरस्कार अमरावतीच्या परिवर्तन शेतकरी गटाला देण्यात आला. दरम्यान या स्पर्धेत बीड जिल्ह्यातील पिंपळगाव दाणी ( ता.आष्टी ) , व्हरकटवाडी ( ता.धारूर ) , मुळूकवाडी ( ता.बीड ) , देवळा ( ता.अंबाजोगाई ) आणि दीपेवडगाव ( ता.केज ) या पाच गावांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना प्रत्येकी 1 लाखाचे पारितोषिक देण्यात आले.

पानी फाऊंडेशनतर्फे पुणे येथील बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ‘सत्यमेव जयते, फार्मर कप २०२२’ च्या पुरस्कार वितरणाचा शानदार साेहळा रविवारी ( दि.12) पार पडला. त्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला पानी फाऊंडेशनचे संस्थापक आमीर खान, किरण राव, सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, पदमश्री पाेपटरावर पवार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, दिग्दर्शक आशुताेष गाेवारीकर, अभिनेते अतुल कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्याच्या सर्वच जिल्हयांतून हजाराे शेतकरी गट, शेतकरी महिला गट उपस्थित हाेते. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वातावरण बदलामुळे शेतीसमोर मोठी आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत अवर्षण, अतिवृष्टीच्या फेऱ्यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी शाश्वत शेतीला पर्याय नाही आणि त्यासाठी विषमुक्त, नैसर्गिक शेतीकडे जावे लागेल. उत्पादन खर्च कमी करून जमिनीचा पोत सुधारावा लागेल. या सर्व गोष्टी आपण नैसर्गिक शेतीद्वारे करू शकतो. राज्यात कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढला. म्हणून आपल्याला नैसर्गिक शेतीकडे यावे लागेल. शासनाच्या जलयुक्त शिवारालाच जोड म्हणून वॉटर कपने शेतकऱ्यांना जलसंधारणासाठी प्रेरित केले. निसर्गाच्या फेऱ्यामुळे निराशेच्या गर्तेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये असलेल्या क्षमतेची आठवण करून देण्याचे कार्य वॉटर कपने केले आणि ग्रामीण भागातील अनेक गावे जलस्वयंपूर्ण झाली, असाही उल्लेख फडणवीस यांनी आवर्जून केला. पानी फाऊंडेशनने 4 लाख शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळविण्याचे उद्दीष्ट ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. आमिर खान म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानी फाऊंडेशनच्या प्रवासात नेहमीच सहकार्य केले. त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून दिलेल्या सहकार्यामुळे चांगले काम करता आले. शेतकऱ्यांनी गट तयार करून आपल्या क्षमता वाढवाव्यात असे आवाहन केले. यावेळी सत्यजित भटकळ आणि पोळ यांनी पानी फाऊंडेशनच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.पानी फाउंडेशन आयाेजित राज्यस्तरीय फार्मर कप स्पधेतील विजेत्यांची नावे प्रथम पुरस्कार- परिवर्तन शेतकरी गट, वाठाेडा, ता. वरुड , जि. अमरावती, रक्कम २५ लाख
दवितीय पुरस्कार- चित्रा नक्षत्र महिला शेतकरी गट, गाेळेगाव, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद, रक्कम १५ लाख रूपये
संयुक्त तृतीय पुरस्कार – जय याेगेश्वर शेतकरी गट , डांगर बुद्रूक, ता. अंमळनेर, जळगाव , रक्कम ५ लाख रुपये संयुक्त तृतीय पुरस्कार – उन्नती शेतकरी गट, वारंगा तर्फे नांदापूर , ता. कळमनुरी, जि. हिंगाेली, रक्कम ५ लाख रुपये याप्रमाणे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Exit mobile version