Site icon लोकाशा-बंब न्यूज

तीन दिवसांमध्ये ११ शेळ्या दगावल्या; हतबल शेतकरी चढला पाणी पुरवठा टाकीवर

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा येथे तीन दिवसांत ११ शेळ्यांचा मृत्यू झाल्याने हतबल शेतकरी आज चक्क पाण्याच्या टाकीवर चढला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि प्रशासनाच्या आवाहनानंतर शेतकरी खाली आल्याची माहिती आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा येथील शेतकरी किसन भाऊजी पवार वय (६५) यांच्या शेळ्याचा मृत्यू दि १२ ऑक्टोबर पासून होत असून आजपर्यंत ११ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने  झाला? याची माहिती नाही आर्थिक नुकसान होत असल्याने हतबल झालेले  पवार प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाणी पुरवठा टाकीवर चढले. मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. ग्रामीण ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, प्रशासनाच्या मोठ्या प्रयत्नानंतर शेतकरी टाकीच्या खाली उतरला आला असल्याची माहिती आहे. 

Exit mobile version